Tuesday, January 27, 2009

बीड जिल्ह्यात ग्रामसभेनंतर दलितांची चार घरे जाळली


प्रजासत्ताकदिनी ग्रामसभेत वाद झाल्यानंतर दलितांची घरे पेटवून देण्यात आली; त्यात मोठे नुकसान झाले.
चौसाळा - प्रजासत्ताकदिनी आयोजित ग्रामसभेत पाणी योजनेसंदर्भातील वाद उफाळून आल्याने दलित सरपंचासह चौघांची घरे पेटवून देण्यात आली. बीड तालुक्‍यातील खडकीघाट येथे घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिघांना अटक केली आहे.खडकी (ता. बीड) हे गाव तांदळवाडी तलावामध्ये जात असल्याने त्याचे पुनर्वसन करावे लागत आहे. गावात भारत निर्माण योजनेंतर्गत 'महाजल' योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी ४४ लाख रुपये खर्चाच्या योजनेस मंजुरी मिळाली आहे. ही ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहे. सरपंचपद मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असून पोपट वाघमारे सरपंच आहेत. सोमवारी ध्वजवंदन झाल्यानंतर दहाच्या सुमारास सरपंच पोपट वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेस सुरवात झाली. सभेत "महाजल'च्या कामाचा विषय विरोधकांनी काढला. पाणीपुरवठा समितीचे अध्यक्षपद भागवत वाघ यांच्याकडे आहे. या समितीत सरपंचाच्या जवळचेच लोक असून भागवत वाघ यांनी ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप ग्रामसभेत विरोधकांनी केला, यावरून वाद चिघळला.


वाचकांच्या प्रतिक्रिया


On January 28th 8:01 AM, Dinkar said:
Hello ! What You want show from this type of news displayed on headline and this type of feedback. Really If had feel guilty then you just do for that using right way and from ourself dont say they doing wrong, what do you mean of this comment had all people given.

On January 28th 8:01 AM, Hrishikesh KUlkarni said:
हा प्रकार किती वेदनादायी आहे! हिंदू धर्मातल्या जातींमधील उच्च-नीचता कधी नष्ट होणार? आपले राजकीय पुढारी काय करतात? स्वतःचा वाढदिवस आला की सगळीकडे स्वतःचा ढोल बडवणारे पुढारी अशा वेळी कुठे असतात? समाजाच्या दुःखांवर फुंकर घालून त्याचे आजार बरे करू शकणारे पुढारी कुठे असतात? ते निवडणुकांत का दिसत नाहीत? आता झालेल्या प्रकाराचे भांडवल करून, सवर्ण विरुद्ध दलित अशी आग पेटवून स्वार्थ साधणार्यां अशांच पुढार्यांची रांग लागेल. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय तर मिळणार नाहीच पण या हरामखोर राजकारण्यांचं मात्र फावेल.

On January 28th 8:01 AM, ??????? ???????? said:
हा प्रकार किती वेदनादायी आहे! हिंदू धर्मातल्या जातींमधील उच्च-नीचता कधी नष्ट होणार? आपले राजकीय पुढारी काय करतात? स्वतःचा वाढदिवस आला की सगळीकडे स्वतःचा ढोल बडवणारे पुढारी अशा वेळी कुठे असतात? समाजाच्या दुःखांवर फुंकर घालून त्याचे आजार बरे करू शकणारे पुढारी कुठे असतात? ते निवडणुकांत का दिसत नाहीत? आता झालेल्या प्रकाराचे भांडवल करून, सवर्ण विरुद्ध दलित अशी आग पेटवून स्वार्थ साधणार्यां अशांच पुढार्यांची रांग लागेल. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय तर मिळणार नाहीच पण या हरामखोर राजकारण्यांचं मात्र फावेल.

भारत हा भिकारड्या लोकांचा आणि उठल्या पडल्या राजकारण करणार्‍यांचा देश आहे. सभ्यता, सौजन्य या गोष्टी शिल्लक राहिलेल्या नाहीत. घडलेली घटना ही सूद्धा राजकारणाचाच भाग आहे. पण मेडीया नेहमीच असल्या गोष्टी मसाला लावून लोकांसमोर आणतो. दलितांची चार घरे जाळली ही कशी भारदस्त हेडलाईन वाटते. " ग्रामसभेत वादावादी " एवढी साधे शिर्षक देवून स्थानिक पातळीवर हे मिटवता आले असते. पण आता या घटनेचा सगळ्यांनाच येत्या निवडणूकीत वापर करता येईल. खरं म्हणजे दलित, सवर्ण असे काही आता शिल्लकच राहिलेले नाही.या शब्दांवर देखील बंदी आणली पाहिजे. पण मायबाप सरकारनेच या सगळ्या गोष्टी ( जातवारी, आरक्षणे ) निर्माण केलेल्या आहेत. जेवढी अस्वस्थता समाजात राहील तेवढी राजकारण्यांना हवीच आहे. त्याशिवाय त्यांची पोळी भाजणार कशी ? ( भागवत बाळनाथ सोनवणे )

No comments: