Wednesday, November 26, 2008

हेमंत करकरे, साळसकर, कामटे यांना वीरमरण

जब घायल हुआ हिमालय
खतरे मैं पड़ी आजादी
जब तक थी सांस लढे वो
फिर अपनी लाश बिछा दी
संगीन पर धर कर माथा
सो गए अमर बलिदानी
दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री मुंबईवर भयंकर हल्ला चढवला. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात 100 जण ठार झाले असून, २५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अतिरेक्यांशी मुकाबला करताना एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख विजय साळसकर आणि एसीपी अशोक कामठे यांच्यासह ७ पोलिस शहीद झाले आहेत. दक्षिण मुंबईतील सातठिकाणी बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास दहशतवाद्यांनी रक्तरंजित हल्ला चढविला. आपल्याकडील एके ४७ रायफलीमधून अंदाधुंद गोळीबार करीत, त्यांनी ग्रेनेडही फेकले. दरम्यान, पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत चार दहशतवाद्यांना गिरगाव चौपाटीजवळ चकमकीत ठार केले. तर दोन दहशतवाद्यांना ताडदेव येथे अटक करण्यात आली. सुमारे २० अतिरेक्यांनी पूर्वनियोजित कट आखून मुंबईवर हा हल्ला केला. अतिरेक्यांशी मुकाबला करताना तिघा ज्येष्ठ पोलिस अधिका-यांनी वीरमरण आल्याचे वृत्त आहे. एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख विजय साळसकर व एसीपी अशोक कामटे चकमकीत शहीद झाले. त्याशिवाय आणखी सात पोलिसांनाही वीरगती प्राप्त झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लष्कराला पाचारण केले आहे. दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी लष्कराचे जवान लवकरच दाखल होणार आहेत. त्याशिवाय २०० कमांडोचेही या ऑपरेशनमध्ये मदत घेतली जात आहे

No comments: